डंपरच्या धडकेने 47 वर्षांच्या स्कूटीचालकाचा मृत्यू

अपघातानंतर डंपरचालकाचे पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 जून 2025
मुंबई, – भरवेगात जाणार्‍या एका डंपरच्या धडकेने सुभाष रघुवीर डुलगच या 47 वर्षांच्या स्कूटीचालकाचा मृत्यू झाला. याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी अपघाताची नोंद करुन गोविंदा कनिरामसिंग चव्हाण या आरोपी डंपरचालकास अटक केली आहे. हा गुन्हा जामिनपात्र असल्याने त्याची नंतर जामिनावर सुटका करण्यात आली. अपघातानंतर पळून गेलेल्या चालकाने पोलीस ठाण्यात आत्मसमर्पण केले होते.

हा अपघात शनिवारी दुपारी पाऊणच्या सुमारास चेंबूर येथील घाटकोपर-मानखुर्द लिंक रोड, शिवाजीनगरकडून छेडानगरच्या दिशेने जाणार्‍या आश्रय रेसीडेन्सी लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डिंगसमोरील दक्षिण वाहिनीवर झाला. संजय रघुवीर डुलगच हा विलेपार्ले येथील एअरपोर्ट हायस्कूलसमोरील बामणवाडा, न्यू ओमकार चाळीत राहत असून मृत सुभाष हा त्याचा मोठा भाऊ आहे. तो अंधेरीतील एका शाळेत शिपाई म्हणून तर त्याचा भाऊ सुभाष हा एका खाजगी हाऊसकिपिंग कंपनीत मॅनेजर म्हणून काम करतो. त्यासाठी त्याला विविध साईटवर जावे लागत होते. शनिवारी सकाळी सुभाष हा नेहमीप्रमाणे कामावर त्याच्या स्कूटीवरुन घरातून निघून गेला होता. दुपारी दिड वाजता संजयचा मित्र अनिल चावरिया हा त्याच्या घरी आला होता. चेंबूर येथे सुभाषचा अपघात झाला असून त्याला उपचारासाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचे सांगितले.

ही माहिती समजताच संजय हा त्याच्यासोबत राजावाडी हॉस्पिटलमध्ये गेला होता. तिथे गेल्यानंतर त्याला त्याचा भाऊ सुभाष याला दुपारी दोन वाजता डॉक्टरांनी मृत घोषित केले. चौकशीदरम्यान सुभाष हा सकाळी कार्यालयातील काम करुन चेंबूर येथील कंपनीच्या साईटवर गेला होता. स्कूटीवरुन जाताना आश्रय रेसीडेन्सी लॉजिंग अ‍ॅण्ड बोर्डिंगसमोरील दक्षिण वाहिनीवर भरवेगात जाणार्‍या एका डंपरने त्याच्या स्कूटीला धडक दिली होती. त्यात सुभाष गंभीररीत्या जखमी झाल्याने त्याला तातडीने राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तिथे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला.

अपघातानंतर आरोपी डंपरचालक गोविंदा चव्हाण हा स्वतहून टिळकनगर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि त्याने घडलेला प्रकार सांगितला. याप्रकरणी संजय डुलगच याच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गोविंदा चव्हाण याच्याविरुद्ध हलगर्जीपणाने डंपर चालवून एका 47 वर्षांच्या व्यक्तीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page