मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
15 एप्रिल 2025
मुंबई, – समय रैना यांच्या लोकप्रिय यूट्यूब रिअलिटी शो इंडिया गॉट लेटेंड कार्यक्रमाच्या माध्यमातून वादग्रस्त आणि आक्षेपार्ह टिका केल्याप्रकरणी यूट्यूबर रणवीर अलाहाबादिया याच्यासह समय रैना यांची मंगळवारी कफ परेड येथील राज्य सायबर सेल पोलिसांनी चौकशी करुन जबानी नोंदवून घेतली होती. या चौकशीनंतर या दोघांनाही सोडून देण्यात आले. अलीकडेच या दोघांसह इतर तीसजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याच गुन्ह्यांत संबंधितांना चौकशीसाठी राहण्याचे समन्स पाठविण्यात आले होते.
रणवीर अलाहाबादिया हा सोशल मिडीयावर प्रचंड लोकप्रिय असून एक्सवर त्याचे सहा लाख, इंटाग्रामवर साडेचार दशलक्ष फॉलोअर्स आहे. त्याचा स्वतचा यूट्युूब चॅनेल असून त्याचे साडेदहा दशलक्ष सबस्क्राबर्स आहेत. काही दिवसांपूर्वी कॉमेडियन समन रैना याने त्याच्या इंडिया गॉट लेटेंट या कार्यक्रमांत यूट्यूबर आशिष चंचलानी, अपूर्वा मुखिजा आणि रणवीर अलाहाबादिया यांना निमंत्रण दिले होते. या कार्यक्रमांत पाहुणा म्हणून आलेल्या रणवीरने काही आक्षेपार्ह आणि वादग्रस्त विधान केले होते.
या विधानानंतर सोशल मिडीयावर प्रचंड टिका झाली होती. हा प्रकार लक्षात येताच रणवीरकडून जाहीर माफी मागण्यात आली होती. मात्र माफी मागूनही त्याच्यावर सोशल मिडीयावर टिका सुरुच होती. त्याच्या या विधानाची काही वकिलांनी गंभीर दखल घेत त्याच्याविरुद्ध खार पोलिसांत लेखी अर्जाद्वारे तक्रार केली होती. या तक्रारीनंतर खार पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. हा तपास सुरु असताना आता महाराष्ट्र सायबर विभागात रणवीर अलाहाबादियासह इतर 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
या गुन्ह्यांचा सायबर पोलिसांनी तपास सुरु केला होता. गुन्हा दाखल होताच समय रैना, रणवीर अलाहाबादियासह इतरांना चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजाविण्यात आले होते. मात्र ते चौकशीसाठी हजर राहत नव्हते. त्यामुळे गेल्याच आठवड्यात त्यांना पुन्हा समन्स पाठविण्यात आले होते. या समन्सनंतर मंगळवारी समय आणि रणवीर हे दोघेही चौकशीसाठी हजर झाले होते. कफ परेड येथील राज्य सायबर सेल विभागात त्यांची चौकशी करुन जबानी नोंदविण्यात आली होती. या जबानीचा तपशील समजू शकला नाही, मात्र चौकशीनंतर या दोघांनाही सोडून देण्यात आले.