साठे कॉलेजच्या 21 वर्षीय कॉलेज तरुणीची आत्महत्या

कॉलेजच्या तिसर्‍या मजल्यावरुन उडी घेऊन जीवन संपविले

0

मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
19 जून 2025
मुंबई, – साठे कॉलेजच्या सायन्सच्या तिसर्‍या वर्गात शिकणार्‍या संध्या सुभाष फाटक या 21 वर्षांच्या कॉलेज तरुणीने आत्महत्या केली. कॉलेजच्या तिसर्‍या मजल्यावरुन उडी घेऊन तिने जीवन संपविले. तिच्याकडे सुसायट नोट सापडली नाही, त्यामुळे तिच्या आत्महत्येमागील कारणाचा खुलासा होऊ शकला नाही. तिचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून तिच्या आई-वडिलांसह मित्र-मैत्रिणीची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. या जबानीतून तिच्या आत्महत्येमागील कारणांचा शोध सुरु आहे. याप्रकरणी विलेपार्ले पोलिसांनी एडीआरची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

सुभाष फाटक हे त्यांच्या कुटुंबियांसोबत विरार परिसरात राहत असून सध्या स्टेट बँकेत प्रॉपटी केअरटेकर म्हणून कामाला आहेत. बँकेने जप्त केलेल्या मुद्देमाल सांभाळण्याची त्यांच्यावर जबाबदारी होती. संध्या ही त्यांची 21 वर्षांची मुलगी असून ती सध्या विलेपार्ले येथील साठे कॉलेजमध्ये सायन्स सॉटिटिकच्या तिसर्‍या वर्षांत शिकत होती. सकाळी ती नेहमीप्रमाणे विरार येथील घरातून कॉलेजला जाण्यासाठी निघाली होती. सात वाजता ती कॉलेजमध्ये आली. कॉलेजच्या इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर आल्यानंतर तिने तिसर्‍या मजल्यावरुन उडी घेतली होती. त्यात ती गंभीररीत्या जखमी झाली होती.

हा प्रकार लक्षात येताच कॉलेजच्या प्राध्यापकांनी विलेपार्ले पोलिसांना ही माहिती दिली होती. या माहितीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. जखमी झालेल्या संध्याला पोलिसांनी तातडीने जवळच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. तिथे तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती नंतर संध्याच्या पालकांना देण्यात आली होती. या माहितीनंतर तिचे आई-वडिल हॉस्पिटलमध्ये आले होते. त्यांनी संध्या ही आत्महत्या करुन शकत नाही, तिला तिसर्‍या मजल्यावरुन कोणीतरी धक्का मारल्याचा संशय व्यक्त केला होता, त्यामुळे पोलिसांनी कॉलेजच्या सीसीटिव्ही फुटेजची पाहणी केली होती, त्यात संध्या कोणीही धक्का दिला नसून तिनेच तिसर्‍या मजल्यावरुन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

संध्याच्या घरातील वातावरण चांगले होते, ती मानसिक तणावात होती असे तिच्या आई-वडिलांना कधीच वाटले नाही. त्यामुळे तिने आत्महत्या का केली याबाबत काहीच माहिती नसल्याचे तिच्या आई-वडिलांनी त्यांच्या जबानीत म्हटले आहे. संध्याने आत्महत्या का केली याचा तपास करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे तिच्या मित्र-मैत्रिणीची लवकरच पोलिसांकडून चौकशी करुन जबानी नोंदविण्यात येणार आहे. तिचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला असून या मोबाईलची तपासणी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान संध्याच्या आत्महत्येचे कॉलेजच्या प्राध्यापकासह विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड शोककळा पसरली होती.

* १० जून २०२५ जे. जे. महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने केली आत्महत्या 
* ८  मे २०२५ मशीद बंदर येथे राहणाऱ्या युवतीने आत्महत्या केल्याची नोंद 
२७  मे २०२५ गोरेगाव पूर्व येथे इमारतीच्या ४५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती 
२३ ऑक्टोबर २०२४ मालाड येथे विद्यार्थिनीने २३ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती. 

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page