पड्घ्याच्या बोरिवली येथे एटीएस-ठाणे ग्रामीण पोलिसांचे ऑपरेशन

तलवारी, सुरे हँडसेट, संशयास्पद कागदपत्रे जप्त  

0
मुंबई क्राईम टाईम्स डॉट कॉम
2 जून 2025
मुंबई, – महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक, ठाणे ग्रामीण पोलिसांनी आज पहाटे पडघा येथील बोरिवली गावात ऑपेरेशन हाती घेतले. ऑपरेशन दरम्यान पोलिसांनी मोबाईल हँडसेट, तलवार, सुरा, संशयास्पद कागदपत्रे, दहशतवादास उत्तेजन देणारी आक्षेपार्ह कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. पोलिसांच्या त्या कारवाईमुळे बोरिवली परिसराला छावणीचे स्वरूपात प्राप्त झाले होते.
मुंबई -नाशिक महामार्गावरील पडघा येथील बोरिवली गावात काहीजण घातपाती कृत्य करण्याच्या तयारीत असल्याची माहिती एटीएसला मिळाली. पोलिसांनी कायेदशीर पद्धतीचा अवलंब करत बोरिवली गावात संशयितांच्या घराची झडतीसाठी न्यायालयाकडून वॉरंट प्राप्त केले. वॉरंट प्राप्त केल्यानंतर एटीएस आणि ठाणे ग्रामीण पोलीस आज पहाटे तीनच्या सुमारास बोरिवली गावात मोठा फौजफाटा घेऊन शिरले. मोठा फौजफाटा घेऊन आलेल्या पोलिसांनी साकिबच्या घरात देखील सर्च ऑपरेशन केल्याचे सूत्रांनी सांगितले.
पोलिसानी १० तास ऑपरेशन हाती घेऊन २२ ठिकाणी शोधमोहीम घेतली. तसेच पोलिसांनी मोबाईल आणि सिमकार्डदेखील जप्त केले आहेत. जप्त केलेल्या मोबाईल आणि सिमकार्ड ची तपासणी करण्यात येत आहेत. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया पोलीस करत होते.
साकिब आणि बोरिवली गाव
भारतात दहशतवादी हल्ला करण्याची योजना आणि २००२, २००३ बॉम्बस्फोटात साकिब नाचणचा मोठा हात होता. साकिब हा पडघा येथील बोरिवली गावात वास्तव्यास होता. बोरिवली गावाची ओळख ही साकिबमुळेच आहे. साकिब हा पूर्वी सिमी या संघटनेसाठी याच गावातून काम करत होता असा त्याच्यावर आरोप आहे. त्याला गुजरात टाडा न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. पाच वर्ष तुरुंगात राहिल्यावर त्याची सुटका करण्यात आली. त्यानंतर २००२-२००३ मध्ये मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात त्याला अटक करण्यात आली होती. त्याला अटक करून ठाणे कारागृहात ठेवण्यात आले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page